TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजना

TADPATRI ANUDAN YOJANA | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध गोष्टींची गरज असते. विविध उपकरणांची गरज असते. विविध साहित्य सामग्रीची गरज असते. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मशागतीची छोटी मोठी अवजारे ट्रॅक्टर शेततळे शेतीसाठी लागणारी काही खते इत्यादी गोष्टींची गरज असते.

महाराष्ट्र शासन सेवा केंद्र शासन शेतकऱ्याला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून अशा गोष्टीवरून देत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानाच्या योजना सरकारमार्फत राबवल्या जातात. वेगवेगळे योजना या प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्याला सरकारच्या मार्फत काढले जातात. सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांची थकीत कर्ज माफ करत असते.

अशा मध्येच सध्या सरकारनं एक योजना हाती घेतली आहे ताडपत्री अनुदान योजना. सदरची योजना आहे या योजनेच्या प्रमाणे शेतकऱ्याला ताडपत्री घेण्यासाठी 50 टक्के रक्कम ही अनुदान म्हणून दिली जाते.

शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन शेती कामाच्या गोष्टींमध्ये ताडपत्री लागत असते तो त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. शेतकऱ्याला ताडपत्री ही शेतमालावरती झाकण्यासाठी मळणी करण्यासाठी अन्नधान्य सुरक्षित राहो म्हणून झाकून ठेवण्यासाठी वाळवणी करण्यासाठी इत्यादी भरपूर अशा कामांसाठी ताडपत्री लागते. तसेच कधीकधी तात्पुरता निवारा म्हणून ताडपत्री लागत असते, अशावेळी ताडपत्री ही छत समजून तात्पुरता एक निवारा शेतकऱ्यामार्फत बांधला जातो.

शेतकऱ्याला कधी कधी रानात असणाऱ्या त्याच्या सामान ठेवण्याचे खोलीच्या छतावर ती आच्छादन म्हणून ताडपत्री टाकायचे असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर काही शेतीचे अवजारे सामान रासायनिक खते वगैरे जर बाहेर पडलेले असतील तर ती झाकण्यासाठी शेतकऱ्याला ताडपत्रीची गरज पडते. अशा दैनंदिन छोट्या-मोठ्या भरपूर गोष्टींसाठी शेतकऱ्याला ताडपत्रीची गरज पडत असते.

म्हणूनच तर सरकारने ताडपत्री अनुदान योजना ही योजना चालू केली. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत निधी पुरवला जातो आणि शेतकऱ्याला ताडपत्रीचे वितरण केले जाते.

चला तर मग आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघून घेऊया नेमकी ताडपत्री अनुदान योजना काय आहे तिच्या उद्देश काय आहे तिच्या मार्फत लाभ काय मिळणारे त्याच्या लाभार्थ्याचे पात्रता काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा या सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….


योजनेचे नावताडपत्री अनुदान योजना | TADPATRI ANUDAN YOJANA
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे व शेतीसाठी प्रोत्साहन देणे
योजनेतून मिळणारा लाभताडपत्री खरेदीसाठी 50% आर्थिक अनुदान
अर्ज कसा करायचाऑफलाइन

TADPATRI ANUDAN YOJANA

Table of Contents

TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यातील गरजू गरीब शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू म्हणून ताडपत्री घेण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे. ताडपत्री घेण्यासाठी 50% रक्कम अनुदान म्हणून देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे.
  • राज्यातील गरजू शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी वस्तू देऊन त्यांना प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांना भविष्यात पावसामुळे होणारे आपल्या पिकाची नासाडी थांबवता यावी त्यासाठी मदत करणे.
  • शेतीसाठी असे विविध उपयोगी उपक्रम राबवून इतर लोकांना शेती या व्यवसायाकडे आकर्षित करणे..

TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजनेचे वैशिष्ट्य –

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जो आर्थिक लाभ मिळणार आहे जे 50 टक्के अनुदान अशी रक्कम मिळणार आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पुरवली जाणार आहे.
  • योजना राज्य शासनाच्या सहकार्याने राबवली जाणार आहे त्याची अंमलबजावणी जिल्हा स्तरावरती सदर जिल्हा परिषदेमार्फत केली जाते.

TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजनेंतर्गत मिळणारा लाभ –

  • शेतकऱ्याला शेतीला उपयोगी असणाऱ्या तडपत्रीच्या खरेदीसाठी 50% रक्कम अनुदान देणे.

TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजने च्या लाभार्थ्याची पात्रता –

  • महाराष्ट्र राज्यातील गरजू गरीब शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजनेचा शेतकऱ्याला होणारा फायदा –

  • शेतकऱ्याला एक शेती मालासाठी सुरक्षा म्हणून ताडपत्री विकत घेण्यासाठी आर्थिक अनुदान मिळत आहे.
  • ताडपत्री विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला पूर्ण रक्कम भरावी लागणार नाही तर 50 टक्के रक्कम शासनामार्फत शेतकऱ्याला दिली जाणार आहे.
  • शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन शेतीच्या कामांमध्ये व प्रवास लागणारे ताडपत्री घेण्यासाठी इतर कोणावरती अवलंबून न राहता तो स्वतःच्या जीवावरती ती ताडपत्री विकत घेऊ शकतो.

TADPATRI ANUDAN YOJANA | ताडपत्री अनुदान योजनेच्या अटी शर्ती-

  • अर्ज करीत असलेला शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे महाराष्ट्राच्या बाहेरी अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ताडपत्री अनुदान योजना ही योजना फक्त शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित आहे.
  • अर्ज करीत असलेला अर्जदार हा खराखुरा शेतकरी असणे गरजेचे आहे त्यासाठी त्याला जमिनीचा सातबारा व आठ अ जोडणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याने जर यापूर्वी कधीही कोणत्याही योजनेअंतर्गत ताडपत्रीचा लाभ घेतला असेल तर तो अर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
  • शेतकरी सोडून इतर सामान्य नागरिक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेतील ताडपत्रीचे 50 टक्के अनुदान घेण्यासाठी प्रथम शेतकऱ्याला स्वतःच्या पैशाने ताडपत्री विकत घेणे गरजेचे आहे त्यानंतर अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नंतर जमा केली जाईल.
  • शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने ताडपत्री घेतल्यानंतर त्याचे बिल पंचायत समितीमध्ये सादर करावे लागते त्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर डीबीटी मार्फत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याचे आधार कार्ड व बँक खाते एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे अन्यथा अनुदानाची लाभाची रक्कम मिळणार नाही.

ताडपत्री अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्र –

  • अर्जदार शेतकऱ्याचे विहित नमुन्यातील अर्ज
  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • ताडपत्री खरेदी केलेले बिल
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • अर्जदाराच्या जमिनीचा सातबारा व आठ अ
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या जाती प्रमाणपत्र
  • शेतीचा नकाशा
  • शेतकऱ्याचा कुटुंबाचे तहसीलदार यांनी साक्षांकित केलेले उत्पन्न प्रमाणपत्र
  • संयुक्त शेत जमीन असल्यास सहकार्याचे ना हरकत प्रमाणपत्र
  • बँक खात्याचे झेरॉक्स

ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे-

  • इच्छुक असणारे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन ताडपत्री अनुदान योजनेबद्दल चौकशी करायची.
  • संबंधित विभागाकडून ताडपत्री अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा त्या अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकती सर्व कागदपत्रे जोडायची व तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.
  • अशा रीतीने अर्जदाराला शेतकऱ्याची ताडपत्री अहवाल योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

ताडपत्री अनुदान योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

ताडपत्री अनुदान योजना कोणी सुरू केली ?

ताडपत्री अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे.

ताडपत्री अनुदान योजनेचा उद्देश काय आहे ?

शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू म्हणून ताडपत्री पुरवण्यासाठी आर्थिक अनुदान पुरवणे.

ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत मिळणारा लाभ कसा आहे ?

तडपत्री अनुदान योजनेअंतर्गत ताडपत्री खरेदीसाठी 50 टक्के रिकामी अनुदान म्हणून मिळते.

ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक लाभ शेतकऱ्याला कसा जमा केला जातो.

तडपत्री अनुदान योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा शेतकऱ्याला थेट त्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो.

तडपत्री अनुदान योजनेची पात्रता काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेला कोणताही शेतकरी या योजनेसाठी पात्र होऊ शकतो .

ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला काय फायदा होतो ?

तडपत्री योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ताडपत्री विकत घेण्यासाठी 50 टक्के रक्कम ही आर्थिक अनुदान म्हणून सरकारमार्फत दिले जाते.

तडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?

अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड रहिवासी दाखला जमिनीचा सातबारा व आठ अ मोबाईल नंबर ईमेल आयडी पासपोर्ट साईज चे फोटो जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला इत्यादी

जर शेतकऱ्याची जमीन ही संयुक्त शेतजमीन असेल तर तो या योजनेसाठी कसा अर्ज करू शकतो ?

संयुक्त मालकीचे असलेले शेत जमिनीसाठी शेतकऱ्याला अर्ज करताना आपल्यासह हिसे दाराचे ना हरकत प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे अशा रीतीने तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

तडपत्री अनुदान योजनेचा अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ?

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला ऑफलाईन मार्ग निवडावा लागतो. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तिथून अर्ज घेऊन अर्ज भरून अर्जासोबत आवश्यकते सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागतो.


तर अशा रीतीने शेतकरी ताडपत्री अनुदान योजनेला अर्ज करू शकतात या योजनेचा फायदा घेऊ शकतो. शेतकऱ्यांनी ताडपत्री अनुदान योजनेचा फायदा घ्यावा व ताडपत्री विकत घ्यावी आपल्या सह शेतकऱ्यांना देखील या योजनेबद्दल त्यांनी माहिती द्यावी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बाजूने जेवढी होईल तेवढी माऊथ पब्लिसिटी करावी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा हेच सरकारचे धोरण आहे. आणि कसा आहे की शेतकरी जर शेतकऱ्याच्या मदतीला नाही जाणार तर बाकीचे जे काय मदत करणार म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःहून या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अशा ज्या फायदेशीर योजना आहेत त्या आपल्या सह शेतकऱ्यांना सांगावे त्या शेतकऱ्यांनी देखील या योजनांचा फायदा घ्यावा.

शेतकऱ्यांनी सरकारमार्फत जाहीर होणारे योजना वरती लक्ष ठेवले पाहिजे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या भरपूर अशा योजना काढत आहे परंतु भरपूर अशा योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जात नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे एकमेकांना या योजनेची माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहील पाहिजे.

अशा रीतीने शेतकऱ्यांनी एकमेकांना मदत करावी आणि आपले भाऊबंद असलेले इतर शेतकरी पुढे जावे हीच आमची इच्छा आहे.

चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये…