GATAI STALL YOJANA | गटई स्टॉल योजना

GATAI STALL YOJANA | जग किती जरी पुढे गेला तरी देखील काही गोष्टी ह्या ट्रॅडिशनल किंवा परंपरा पद्धतीने होत असतात. जसं की चामड्याच्या पादत्राणे वापरणे आज देखील खेडेगावांमध्ये किंवा शहरी भागांमध्ये भरपूर लोक चामड्याच्या पादत्राणे वापरतात.

त्यासाठी त्यांना चर्मकार व्यवसायिकाची गरज भासते आणि आपण जर बघितलं तर चर्मकार व्यवसाय रस्त्याच्या कडेला ऊन वारा पावसामध्ये उघड्यावरती त्यांच्या व्यवसायाची सेवा देण्यासाठी बसलेली असतात. त्यांना एक व्यवसायाला हातभार म्हणून किंवा त्यांच्या व्यवसायाची प्रगती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने गटई स्टॉल योजना सुरू केली.

चला तर मग बघूया ही GATAI STALL YOJANA नेमकी काय आहे त्याच्या पात्र त्याच्या अटी काय आहेत त्याचा अर्ज कसा करायचा त्याचा लाभ कसा घ्यायचा सर्व बाबीं बद्दल…


योजनेचे नावगटई स्टॉल योजना महाराष्ट्र | GATAI STALL YOJANA
योजनेचा उद्देशचर्मकार समाजाला त्यांचा विकास व्हावा म्हणून पत्र्याचे स्टॉल बांधून देणे.
योजनेचे पात्र लाभार्थीअनुसूचित जातीतील गटई कामगार
योजनेतून मिळणारा लाभमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल बांधून मिळतील.
अर्ज कसा करायचाऑनलाइन किंवा ऑफलाइन

GATAI STALL YOJANA

GATAI STALL YOJANA | गटई स्टॉल योजनेचे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असलेल्या चर्मकार समाजातील गटई कामगारांना जे रस्त्याच्या कडेला ऊन वारा पावसामध्ये चपला नीट करण्याचे काम करत असतात अशा कामगारांना पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून पत्र्याचे स्टॉल बांधून देण्याची योजना आहे.
  • चर्मकार समाजातील कामगारांना स्टॉल बांधून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे.
  • गटई कामगारांना पत्र्याची स्टॉल हे शंभर टक्के अनुदान तत्व वरती बांधून देणे.
  • चर्मकार समाजातील ढोर होलार मोची इत्यादी लोक रस्त्याच्या कडेला जे काम करतात त्यांना एक पक्का दुकान किंवा स्टॉल बांधून देणे.

GATAI STALL YOJANA | गटई स्टॉल योजनेची वैशिष्ट्ये

  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील चर्मकार व्यावसायिकांना शंभर टक्के अनुदान तत्त्वावरती पत्र्याचा स्टॉल बांधून मिळणार आहे.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत त्या लाभार्थी चर्मकार व्यावसायिकाला एक रुपयाही पदरने खर्च करण्याची गरज नाही.
  • समाज कल्याण आयुक्त पुणे आणि चर्मकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गटई स्टॉल योजना राबवली जात आहे.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत स्टॉल पुरवण्याची जबाबदारी संत रोहिदास चर्मोद्योग व कर्मकार विकास महामंडळ मुंबई यांनी घेतलेली आहे.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी स्टॉल बसवला आहे अशा लाभार्थ्यांना योजनेच्या अनुदानाची रक्कम ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाईल.

GATAI STALL YOJANA | गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी –

  • अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार व्यवसाय करणारे नागरिक.

GATAI STALL YOJANA | गटई स्टॉल योजनेचा फायदा –

  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रस्त्याच्या कडेला बसून चर्मकार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र शासन 100% अनुदान देऊन एक पत्र्याचा स्टॉल देत आहे.
  • या योजनेअंतर्गत त्या चर्मकार व्यवसायाला स्वतःच्या पदरचा एक रुपयाही घालवण्याची गरज नाही शंभर टक्के खर्चाची जबाबदारी ही सरकार घेत आहे.
  • पत्र्याचे स्टॉल बरोबरच त्यांना सरकारकडून 500 रुपयांचे रोप अनुदान देखील मिळते.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत नागरिकांना एक पत्राचा स्टॉल दिल्यानंतर त्यांना एक हक्काची जागा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध होते.
  • चर्मकार व्यावसायिकांना ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण या गटई स्टॉल योजनेअंतर्गत मिळते.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत चर्मकार व्यावसायिकांना अधिकृत परवाना देखील काढून दिला जातो जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा अतिक्रमण कारवाईचा सामना करण्याची गरज भासू नये.
  • गटई स्टॉल योजनेमुळे चर्मकार व्यावसायिकांना एक चांगले उत्कृष्ट प्रकारचे स्टॉल बांधून मिळाल्यामुळे परिणामी त्यांच्या व्यवसायाला हातभार लागणार आहे आणि परिणामी त्यांची उन्नती होणार आहे.

GATAI STALL YOJANA | गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभार्थ्याची आवश्यक पात्रता –

  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत ज्या चर्मकार व्यावसायिकाला स्टॉल चा लाभ घ्यायचा आहे तो व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

गटई स्टॉल योजने बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी –

  • ज्या रस्त्याची रुंदी ही 24 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा रस्त्यांवर गटई स्टॉल लावण्यास परवाना मिळणार नाही.
  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत ज्या रस्त्याची रुंदी ही नऊ मीटर ते वीस मीटर आहे आणि तिथे चालणाऱ्या पादुसाऱ्यांना त्या स्टॉलचा अडथळा होणार नाही अशाच ठिकाणच्या स्टॉलला परवाने मिळतील.
  • 1.2 मीटर * 1.2 मीटर * 1.80 मीटर अशा साईजचा जागेला बैठा परवाना मिळेल.
  • स्टॉलच्या मागील बाजूची उंची 4*5*6 फूट व फुडील बाजूची उंची 6.5 फूट असणार आहे.
  • त्या स्टॉल वरती व्यवसाय करण्याची परवाना हा सकाळी आठ ते रात्री आठ यादरम्यानच्या वेळेसाठी मिळणार आहे.
  • गटई स्टॉल योजना अंतर्गत दिला जाणारा परवाना हा 11 महिन्यांसाठी असेल.
  • या योजनेला अर्ज करताना जातीचा दाखला जमा करणे बंधनकारक आहे.
  • घटस्फोट योजनेअंतर्गत परवाना देताना अशा ठिकाणी परवाना दिला जातो की तिथे पहिले कोणतेही कामगाराचे स्टॉल नसला पाहिजे दोन स्टॉल मधील अंतर हे 50 मीटर असले पाहिजे.
  • गटई स्टॉल योजने अंतर्गत मिळणाऱ्या परवाना मध्ये कामगारांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी एक पेटी आणि दोन-चार नवीन चपला किंवा बुटाच्या जोडी विकण्याला परवानगी या परवानगी मध्ये दिली आहे.
  • पावसाळ्यामध्ये पावसाच्या त्रासापासून वाचण्यासाठी गटई स्टॉल योजनेअंतर्गत चर्मकार व्यवसायिकांना 1.2 मीटर * 1.5 मीटर साईजचे प्लास्टिक आच्छादन घालण्यासाठी सूट देण्यात आलेले आहे.
  • परवाना काढण्यासाठी मिळालेल्या अर्जावरती महापालिका किंवा नगरपालिका या जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत मध्ये निर्णय घेतात.
  • जर लाभार्थ्याने परवाना घेतला आणि त्यानंतर संबंधित नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला असे आढळून आले की त्या लाभार्थ्याचा स्टॉल हा रहदारीच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे तर कोणतेही कारण न देता त्या व्यक्तीचा परवाना रद्द केला जाऊ शकतो व त्याला त्या ठिकाणावरून ठेवले जाऊ शकते परंतु जर त्या वेळामध्ये लाभार्थ्याने दुसऱ्या जागेची सोय केली तर त्याचा परवाना चालू ठेवण्यात येईल.
  • जर चर्मकार व्यावसायिकाने त्याच्या स्टॉलसाठी सरकारची आर्थिक अनुदानाची मदत घेतली असेल तर त्या व्यवसाय करा तो स्टॉल विकता येणार नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीस हस्तांतरित देखील करता येणार नाही.

गटई स्टॉल योजनेच्या अटी आणि शर्ती –

  • सदरची योजना ही फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांसाठी आहे, महाराष्ट्र बाहेरी इतर गटई कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जो व्यक्ती गटई स्टॉल योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे असा व्यक्ती हा अनुसूचित जातीतील असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे वय हे 18 ते 50 या वयोगटात दरम्यान असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या गटई कामगाराला त्याच्या व्यवसायाबद्दल नॉलेज असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे ग्रामीण भागासाठी जास्तीत जास्त 98 हजार शहरी भागासाठी एक लाख वीस हजार याच्या आत असणे आवश्यक आहे..
  • अर्ज करीत असलेल्या व्यक्तीकडे तहसीलदाराचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने या अगोदर कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या गटई स्टॉल योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे.
  • अर्जदाराला ज्या ठिकाणी गटई स्टॉल लावायचा आहे अशा ठिकाणची जागा ही त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी किंवा त्या ठिकाणी जागाही महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांनी उपलब्ध करून दिलेली असावी.
  • एकदा गटई स्टॉल योजनेअंतर्गत अर्जदाराला लाभ म्हणून स्टॉल मिळाला त्यानंतर त्या स्टॉलची जबाबदारी देखभालीची सुरक्षेची सर्वस्वी लाभार्थीची राहील.
  • योजनेअंतर्गत मिळालेला स्टॉल हा लाभार्थीला भाडेतत्त्वावरती देता येणार नाही किंवा विकता देखील येणार नाही.
  • अर्जदार गरीब कुटुंबातील असावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरीत नसणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्याला स्टॉलचे वाटप झाल्यानंतर त्या वाटपाबाबतचे पत्र इन्स्टॉल वरती पुढील बाजूस लावणे बंधनकारकच आहे.

गटई स्टॉल योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईट चे फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अर्जदार दिव्यांग असेल तर त्याच्या सर्टिफिकेट
  • बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स आणि
  • शपथपत्र.

गटई स्टॉल योजनेचा अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे –

  • जर महाराष्ट्राच्या बाहेरी कोणत्याही व्यक्तीने या योजनेसाठी अर्ज केला तर त्या व्यक्तीचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • जर अर्जदार हा अनुसूचित जातीतील नाही हे उघड झाल्यास किंवा त्याने जातीचा दाखला अर्जासोबत जोडला नाही तर त्या अर्जदाराचा अर्ज बाद केला जातो.
  • झोप अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक आर्थिक उत्पन्न मर्यादा आहे ग्रामीण भागासाठी 98 हजार आणि शहरी भागासाठी एक लाख वीस हजार यापेक्षा जास्त असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जाची छाननी करताना जर अर्जदाराचे वय हे 18 पेक्षा कमी किंवा 50 पेक्षा जास्त आढळून आली तर अर्ज बाद केला जाईल.
  • जर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरीत कार्यरत आहे हे उघडकीस आल्यास त्या अर्जदाराचा अर्ज बाद केला जाईल.

गटई स्टॉल योजनेला अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • ज्या चर्मकार व्यावसायिकाला गटई स्टॉल योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा व्यवसायिकांनी आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागात कार्यालयात जायचे.
  • संबंधित योजनेचा अर्ज घ्यायचा त्या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती भरून आवश्यकते कागदपत्रे जोडायची तो अर्ज पुन्हा एकदा चेक करायचा.
  • सदरचा भरलेला अर्ज संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचा अशा रीतीने तुमचा गटई स्टॉल योजनेचा अर्ज भरून होईल.