GAY GOTHA ANUDAN YOJANA | आज जर बघितलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि बहुसंख्य लोकसंख्या वर्गाचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु शेतीबरोबरच जास्त टक्केवारीने म्हणा किंवा जास्त प्रामुख्याने केला जाणारा जर कोणता धंदा असेल किंवा जोडधंदा म्हणून देखील त्याला केला जातो तर तो म्हणजे आहे पशुपालन व्यवसाय. या व्यवसायामध्ये भारतासारख्या देशांमध्ये प्रामुख्याने गाई आणि म्हशी पाण्याचं प्रथा किंवा परंपरा आहे. काही शेतकरी पशुपालन हा एक जोडधंदा म्हणून करतात तर काही शेतकरी पशुपालन हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय म्हणून करत असतात.
पशुपालन हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय म्हणलं की त्याच्यामध्ये अडचणी ह्या आल्याच, जशा इतर व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रकारचे अडचणी असतात तसेच या पशुपालन व्यवसायामध्ये देखील शेतकऱ्यांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते. पशुपालन व्यवसाय मध्ये प्रमुख अडचणी जर बघितल्या तर रोगराई वाढते खाद्यांचे रेट परत शेतीला येणाऱ्या अडचणी त्या अडचणीमुळे शेती ची होणारी नासदूस, दुधाला मिळणारा कमी भाव, वाढलेली उपचाराचे खर्च, असे विविध अडचणी या पशुपालन व्यवसायामध्ये आहे.
यामध्येच अजून एक अडचण अशी आहे की गुरांसाठी लागणारा गोठा, काही शेतकऱ्यांना पक्का कोटा बंद शक्य होत नाही कारण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हे शक्य होत नाही. शेतकऱ्यांच्या पुढे त्यांचे दैनंदिन खर्च भागवणे घरातील सदस्यांच्या आरोग्याची खर्च भागवणे मुलांच्या शाळेचा खर्च भागवणे आणि पशुपालन व्यवसायातील इतर जे खर्च आहेत ते भागवणे या सर्व समस्या त्यांच्यासमोर असतात. अशांमध्ये शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी पैसे वाट्याला येत नाहीत.
जनरली जर आपण बघितलं तर गावाकडचे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कमी संख्येमध्ये गुरे आहेत जसे की दोन चार आठ दहा असे शेतकरी आपल्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यांच्या गोट्याची अवस्था ही खूप दयनी असते जसे की गुरांना खाण्यासाठी गव्हाणी किंवा दावण नसणे, गुरांच्या शेणाचा मूत्राचा योग्य रीतीने विल्हेवाट न लावणे, गुरांना टाकलेली खाद्य गुरांच्या पायापर्यंत पोहोचणे, गुरांच्या पायात खाली सिमेंटचा कोबा नसणे, गायांना बसण्यासाठी मॅट नसणे, असे विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स हे शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये बघायला मिळतात. आणि गोठ्याची हालत जर चांगली नसेल तर त्याचा परिणाम हा गुरांच्या आरोग्यावरती आणि दुधाच्या प्रतिवर्ती होत असतो. यामुळे या गोष्टीचा इम्पॅक्ट हा अति प्रमाणात खर्च आणि कमी उत्पन्न असा दिसून येतो.
तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं आणि शेतकऱ्यांनी एक चांगला पक्का गोठा बांधावा यासाठी सरकारने एक योजना काढली आहे. त्या योजनेचे नाव गाय गोठा अनुदान असे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत एक अनुदान म्हणून दिली जाते.
सरकार एक ठराविक टक्केवारी मध्ये आर्थिक मदत शेतकऱ्याला करत असते उर्वरित पैसे शेतकऱ्याला स्वतःच्या बाजूने भरायचे असतात. अशा रीतीने ही योजना कार्य करते.
तर ही योजना नेमकी कशी आहे ही कोणामार्फत सुरू करण्यात आली या योजनेच्या पात्रतेच्या काही निकष अटी आहेत या योजनेच्या मार्फत नेमका किती रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे या योजनेला अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टींची चर्चा आज आपण या ब्लॉगमध्ये करणार आहोत तर चला तर मग सुरु करूया आपण आजच्या GAY GOTHA ANUDAN YOJANA च्या ब्लॉगला…
योजनेचे नाव | गाय गोठा अनुदान योजना | GAY GOTHA ANUDAN YOJANA |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे आणि एक उत्तम दर्जाचा गोटा उपलब्ध करून देणे. |
योजनेची लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व पशुपालक |
योजनेतून मिळणाऱ्या लाभ | योजनेतून लाभ हा आर्थिक स्वरूपात मिळतो गोठा बांधण्यासाठी |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |

GAY GOTHA ANUDAN YOJANA | गाय गोठा अनुदान योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील असणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना गाई म्हशीसाठी पक्क्या स्वरूपाचा गोटा बनण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणे.
- राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
- गाई म्हशी व इतर जनावरांचा उनवारा पाऊस थंडी यापासून संरक्षण करणे आणि त्यासाठी योग्य ते उपाययोजना करणे.
- शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जनावरांसाठी एक कायमस्वरूपी चे छत व गोटा बांधून देणे.
- अशा प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा अजून एक महत्त्वाचा उद्देश असा असतो की या योजनांकडे बघून इतर बाकी शेतकरी किंवा नागरिक पशुपालनाकडे आकर्षित व्हावे आणि पशुपालनाचा व्यवसाय अजून वाढावा.
GAY GOTHA ANUDAN YOJANA | गाई गोठा अनुदान योजनेचे वैशिष्ट्य –
- ही योजना महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभागामार्फत अमलात आणली जाते.
- योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो त्यामुळे गैर व्यवहार होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात.
GAY GOTHA ANUDAN YOJANA | गाय गोठा अनुदान योजनेमध्ये मिळणारा आर्थिक लाभ पुढीलप्रमाणे –
- जर अर्ज करीत असलेल्या पशुपालकाकडे दोन ते सहा गुरे आहेत तर त्याला 77 हजार 188 रुपयांचे अनुदान मिळते.
- जर पशुपालकाकडे सहा ते बारा यादरम्यान गुरे असतील तर त्याला एक लाख 54 हजार 376 रुपये अनुदान मिळते जे की पहिल्या 77 हजार 188 रुपयांच्या दुप्पट आहे.
- आणि 18 पेक्षा जास्त गुरे असणारे पशुपालकांना तिप्पट अनुदान देण्यात येते म्हणजेच दोन लाख 31 हजार 564 रुपये.
GAY GOTHA ANUDAN YOJANA | गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोटा बांधण्याची पद्धत पुढील प्रमाणे असावी –
दोन ते सहा गुरांसाठी –
- 26.95 चौरस मीटर निवारा असणे गरजेचे आहे आणि त्याची लांबी 7.70 मीटर व रुंदी 3.50 मीटर असली पाहिजे.
- गव्हाण 7.7 मीटर X 2.2 मीटर X 0.65 मीटर अशा लांबी रुंदीची असणे गरजेचे आहे.
- अडीचशे लिटर क्षमता असलेला मूत्रसंच टाकी बांधणे गरजेचे आहे.
- 200 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे बंधनकारक आहे.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता –
- अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेला पशुपालक हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गांमधील असणे गरजेचे आहे
- अर्जदाराचे कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली असणे बंधनकारक आहे.
- कुटुंब हे महिला प्रधान असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
- भोसदार योजनेची लाभार्थी किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या प्रधान कुटुंबाला प्राधान्य देण्यात येईल.
- वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार जे पात्र वन्यनिवासी व्यक्ती आहेत अशा लोकांना देखील प्राधान्य आहे.
- अशा शेतकरी ज्यांच्या जमिनी एक एक हेक्टर कमी आहे.
- 2008 च्या कृषी कर्ज माफीनुसार जे शेतकरी अल्पभूधारक गटांमध्ये येतात ते.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी –
- अर्जदाराने सरकारच्या वैयक्तिक व सार्वजनिक कामाच्या संयोजनातून अतिशय कुशल प्रमाण ६०:४० लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजनेअंतर्गत काम केलेले असले पाहिजे आणि असे काम केलेल्याचा शिफारस दाखला ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याकडून घेऊन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
- या योजनेच्या अर्जदाराने मनरेगा किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर वीस ते पन्नास फळझाडे किंवा वृक्ष लागवड केलेली असली पाहिजे आणि त्या झाडांचे तीन वर्षे संगमन करून शंभर टक्के झाडे जिवंत ठेवलेली असणे गरजेचे आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू वर्षात ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामांमध्ये शंभर दिवस काम पूर्ण केलेले असले पाहिजे.
- १. जर प्रचार आणि वैयक्तिक क्षेत्रावरती वीस ते पन्नास फळझाडे किंवा वृक्ष लागवड केली असेल तर त्याला छताविरहित गाय गोटा च्या कामाचा लाभ मिळेल.
- 2. जर अर्जदाराने 50 पेक्षा जास्त फळझाडे किंवा वृक्ष लागवड केलेली आहे आणि ती झाडे तीन वर्षापेक्षा जास्त जिवंत आहेत तर असा अर्जदार हा छता सहित गाय गोठा ज्या कामाचा लाभ घेऊ शकतो.
- 3. जर अर्जदाराने सार्वजनिक कामांमध्ये शंभर दिवसापेक्षा जास्त काम केलं असेल तर त्याला छतासह घोटायचा कामाचा लाभ मिळेल.
- अर्जदाराला पशुधन अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांचा असा दाखला देणे गरजेचे काय आहे की अर्ज करीत असलेल्या व्यक्ती हा पशुपालक आहे.
- कमीत कमी दोन ते सहा गुरे टॅगिंग सह त्या अर्जदार व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे.
- त्या कुटुंबाचे मनरेगा चे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्ज करीत असलेल्या व्यक्तीच्या नावावरती जमीन असणे गरजेचे आहे तसा त्याने सातबारा खाते उतारा जोडावा.
- तो व्यक्ती ज्या गावातून गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करीत आहे त्या गावाचा तो रहिवासी असणे बंधनकारक आहे.
गाय गोठा अनुदान योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर खालील टप्प्यावरील फोटो काढून ते जमा करणे बंधनकारक आहे –
- काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो
- काम सुरू असतानाचा फोटो
- काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीचे नाव टाकून बोर्ड लावून तो फोटो.
वरील तीन फोटो अंतिम प्रस्तावासोबत सात दिवसाच्या आत सादर करावा लागतात.
या योजनेची लाभार्थी कोण आहेत ?
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशुपालक हे या योजनेची लाभार्थी आहेत.
गोठा अनुदान योजनेचा फायदा –
- महाराष्ट्राचे शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीचा पक्का गोट्याचा बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक रूपात अनुदान मिळत आहे.
- गोठा बांधणी नंतर जनावरांचा ऊन वारा पाऊस थंडी यापासून संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे.
- या योजनेमुळे समाजातील इतर नागरिक शेतकरी पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित होती आणि या योजनेचा लाभ घेतील.
गाय गोठा अनुदान योजनेच्या अटी आणि शर्ती –
- ज्ये महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत अशा पशुपालक व शेतकऱ्यांना फक्त या योजनेचा लाभ घेता येईल महाराष्ट्र बाहेरील कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- एक कुटुंब फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- कमीत कमी दोन ते सहा गुरे ज्या पशुपालकाकडे आहेत तोच पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- अर्ज करीत असलेला व्यक्ती हा पशुपालक असावा त्याला त्या क्षेत्रातील नॉलेज असावे आणि तसे प्रमाणपत्र त्यांनी अर्ज सोबत जोडावे.
- अर्जदाराने आपल्याकडे असलेल्या गुरांची टॅगिंग करणे गरजेचे आहे.
- अर्जदाराला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला सार्वजनिक कामांमध्ये किमान शंभर दिवस काम करणे बंधनकारक राहील तसेच त्याने वैयक्तिक क्षेत्रामध्ये 20 ते 50 फळझाडे किंवा वृक्ष लागवड केलेली असावी.
GAY GOTHA ANUDAN YOJANA अर्जदारांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना –
भरपूर अर्ज करीत असलेले पशुपालक शेतकरी या गोष्टीची तक्रार करतात की आम्ही अर्ज करून देखील आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतु या ठिकाणीही एक गोष्ट लक्षात घ्या की जो अर्जदार आपल्या वैयक्तिक क्षेत्रावर ते वीस ते पन्नास फळझाडे किंवा वृक्षांची लागवड करेल आणि त्याचे संगोपन करेल तो आणि याच सोबत त्याने सार्वजनिक काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करणे गरजेचे आहे ती काम त्यांनी किमान 100 दिवस करणे बंधनकारक आहे. या अटी पुरतो केल्या तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
GAY GOTHA ANUDAN YOJANA साठी आवश्यक कागदपत्रे –
- अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचा रहिवासी दाखला अर्जदाराचा जातीचा दाखला जनावरांना टॅगिंग केली आहे त्याचा दाखला
- कुटुंबाचे नरेगाची ओळखपत्र आणि जॉब कार्ड चे झेरॉक्स ची प्रत
- जमिनीचा सातबारा व आठ अ आणि ग्रामपंचायत नमुना 9चा उतारा
- बँक पासबुक ग्रामपंचायत कडून प्राधान्यक्रमाचा शिफारस पत्र मोबाईल नंबर ईमेल आयडी पासपोर्ट आकाराचे फोटो स्वयंघोषणापत्र निवडलेल्या जागेचा अक्षांश रेखांश असलेला फोटो.
GAY GOTHA ANUDAN YOJANA साठी ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत –
- अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या पशुपालकाने आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा आहे.
- पंचायत कार्यालया मधून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा अर्ज तर विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- आवश्यकते सर्व कागदपत्रे अचूकरीत्या त्या अर्जासोबत जोडायचे आणि तो अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचा.
- अशा रीतीने तुमचा गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म भरून होईल.