KHAVATI ANUDAN YOJANA | महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी जमातीतील लोकांचं दैनंदिन जीवन हे हाताच्या पोटावरती आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना पावसामुळे रोजगाराच्या संधी खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जाते.
हे आर्थिक सहाय्यक करण्यामागचा हेतू हा त्या कुटुंबातला आर्थिक पाठबळ पुरवणे त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना स्पेशली आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी बळ निर्माण करणे हाय.
चला तर मग बघूया हि KHAVATI ANUDAN YOJANA नेमकी काय आहे या योजनेचे पात्रतेसाठी काय आहे योजना नेमकी कोणासाठी आहे ही योजना कशी कार्य करते या योजनेला अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे या योजनेमध्ये अर्ज बाद होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | खावटी अनुदान योजना | KHAVATI ANUDAN YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभाग |
योजनेचा उद्देश | गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे. |
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता | अनुसूचित जमाती मधील आदिवासी कुटुंबे |
योजनेतून मिळणारा लाभ | चार हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |

KHAVATI ANUDAN YOJANA | खावटी अनुदान योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्रातील रहिवासी असलेले दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अनुसूचित जमाती मधील आदिवासी कुटुंबे अशा नागरिकांना पावसाळ्यामध्ये रोजगाराच्या संधी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. अशा परिस्थितीमध्ये जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभाग यांनी खाऊटी अनुदान योजना सुरू केली.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरजू आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत पुरवणे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असलेल्या अनुसूचित जमाती मधील आदिवासी कुटुंबांना त्यांचे दैनंदिन जीवन जगताना आर्थिक मदत पुरवणी त्यांना आर्थिक पाठबळ देणे आणि त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त करून देणे.
- आदिवासी कुटुंबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
KHAVATI ANUDAN YOJANA | खावटी अनुदान योजनेचे वैशिष्ट्य –
- सदरची योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या समाज कल्याण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थीला मिळणारी योजनेच्या लाभाची रक्कम ही त्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पुरवली जाते.
- महाराष्ट्र शासनाने सदरच्या योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
- जुन्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान हे रोख रक्कम आणि 50 टक्के अनुदान हे वस्तू स्वरूपात दिले जात होते. परंतु नव्यानेमानुसार महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की 100% लाभाची रक्कम ही रोख स्वरूपात लाभार्थीला दिली जाईल.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ लाभार्थीच्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावरती जमा केला जातो. जर महिला सदस्याचे बँक अकाउंट नसेल तर ते शासनामार्फत उघडून दिले जाते.
- खावटी अनुदान योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेचा उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील अकरा लाख 55 हजार कुटुंबांना लाभ देणे हा आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने 486 कोटी रुपयांचे बजेट ठरवलेले आहे.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जर त्या भागांमध्ये जवळपास बँक कार्यरत नसेल तर अशा भागांमध्ये योजनेचा लाभ देण्यासाठी भारतीय डाक / इंडियन पोस्ट याचा उपयोग केला जाणार आहे.
KHAVATI ANUDAN YOJANA | खावटी अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे –
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत जे कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहे अशा कुटुंबाला सरकार शंभर टक्के अनुदान देत आहे.
- अनुसूचित जमातीमधील ज्या कुटुंबामध्ये चार कुटुंब सदस्य आहेत अशा कुटुंबाला दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
- अनुसूचित जन्मातील अशा कुटुंब तुमच्या कुटुंबाचं सदस्य संख्या हे पाच ते आठ याच्या दरम्यान आहे अशा कुटुंबाला तीन हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
- अनुसूचित जमातीतील लाभार्थी चे कुटुंब की ज्याच्यामध्ये सदस्य संख्या आठ आणि त्याच्यापुढे आहे अशा कुटुंबाला चार हजार रुपयांच्या आर्थिक साह्य योजना अंतर्गत दिले जाते.
KHAVATI ANUDAN YOJANA | खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थी पुढील प्रमाणे –
- माडिया वर्गातील कुटुंबे
- आदिम जमातीची सर्व कुटुंबे
- मनरेगा मध्ये कार्यरत असलेले आदिवासी मजूर
- भूमिहीन मजूर
- पारधी जमातीची सर्व कुटुंबे
- आदिवासी वर्गातील कुटुंब
- घटस्फोटीत महिला
- विधवा महिला
- कोलाम वर्गातील कुटुंबे
- अपंग व्यक्तीचे कुटुंब
- वाहन हक्क धार कुटुंबे
- अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब
- कातकरी वर्गातील कुटुंबे
KHAVATI ANUDAN YOJANA | खावटी अनुदान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू पुढील प्रमाणे-
- उडीद डाळ
- मटकी
- चवळी
- चहा पावडर
- साखर
- तुरडाळ
- मीठ
- हरभरा
- वाटाणा
- शेंगदाणा
- तेल
- मिरची पावडर
- गरम मसाला
खावटी योजनेचा फायदा –
- अनुसूचित जमातीतील दारिद्र रेषेखालील असणारे आदिवासी कुटुंबांना सदर योजनेच्या अंतर्गत रुपये 4000 इतक्या रकमेपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते.
- सदरच्या योजनेच्या लाभामुळे आदिवासी समाजाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे आणि तसेच ते मुख्य प्रवाहात येतील.
खावटी योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता –
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असला पाहिजे.
खावटी योजनेसाठी काही लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी आणि शर्ती –
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासी कुटुंबांना स्पष्ट या योजनेचा लाभ घेता येईल महाराष्ट्राच्या बाहेरी कोणत्याही आदिवासी तुम्हाला किंवा अनुसूचित जमातीतील आदिवासी कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सुदर्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने येऊन दिलेला सर्व अटी आणि नियमांमध्ये पात्र होणे गरजेचे आहे.
- जर अर्ज करीत असलेले कुटुंब हे या अगोदर किंवा सध्या कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्य मिळवणाऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी पात्रता होऊ शकत नाही.
- जर अर्ज करीत असलेल्या कुटुंबांमधील कोणीही सरकारी नोकरी करत असेल तर असे कुटुंब या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही.
- अर्ज करीत असलेल्या कुटुंबातील महिलेची बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्ज करीत असलेल्या महिलेला आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांना लिंक असणे बंधनकारक आहे कारण आर्थिक लाभाची रक्कम ही डीबीटी मार्फत बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते.
- अनुसूचित जमातीतील आदिवासी कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील असणे बंधनकारक आहे तरच त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराला अर्जासोबत तहसीलदाराने दिलेला जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- योजना फक्त ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकां करीत आहे.
खावटी योजनेच्या अंतर्गत वस्तूंचे वाटप करण्याची पद्धत पुढील प्रमाणे-
- सदरच्या योजनेअंतर्गत वस्तू स्वरूपात देखील या योजनेचा लाभ दिला जातो.
- हा वस्तू स्वरूपातील लाभ देण्यासाठी सर्व वस्तू एका बॅगमध्ये पॅक केल्या जातात आणि त्या बॅग वरती नोट फॉर सेल असे प्रिंट केले जाते आणि त्या वस्तू वाहनाच्या मदतीने वेगवेगळ्या गावांमध्ये पुरवले जातात .
- त्या वस्तूंचे वाटप कधी होणार आहे हे त्या गावांमध्ये सर्व लाभार्थींना अगोदर कळविण्यात येईल.
- त्यानंतर गावातील सरपंच उपसरपंच महिला ग्रामपंचायत सदस्य अनुसूचित जमातीचे ग्रामपंचायत सदस्य मी ते त्यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थी महिलेला या वस्तू सुपूर्द केल्या जातील आणि त्यांच्याकडून पोचपावती घेतली जाईल.
- अशा रीतीने वस्तू वाटप करण्याची प्रोसेस आहे.
खावटी योजनेसाठी अर्ज करताना लागणारे कागदपत्रे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईचे फोटो
- बँक अकाउंट नंबर
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
- विधवा महिलेच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोटित महिलेचा न्यायालयीन आदेश
खावटी योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे पुढील प्रमाणे –
- जर अर्ज करीत असलेले कुटुंब ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- जे आदिवासी कुटुंब या योजनेला अर्ज करत आहे ते कुटुंब जर दारिद्र्य रेषेखालील नसेल तर अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराकडे जातीचा दाखला नसेल किंवा तो अनुसूचित जमातीच्या जाती प्रवर्गांमध्ये मोडत नसेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- जर अर्जदार कुटुंब या अगोदर कोणत्याही केंद्र शासकीय राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत आर्थिक साही मिळवत असेल तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही म्हणून अर्ज केला जाईल.
खावटी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत –
- ज्या कुटुंबाला सदर योजनेचा लाभ घेत आहे अशा कुटुंबाने आपल्या भागातील ग्रामपंचायत कार्यालयात नगरपालिका नगर परिषद आदिवासी विकास योजना कार्यालयात जाऊन या संबंधित योजनेची चौकशी करायची आणि तेथून अर्ज घ्यायचा.
- तो अर्ज घेऊन व्यवस्थित रित्या बाहेर येऊन व्यवस्थित अर्ज वाचायचा आणि तो अर्ज विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडायची.
- पुन्हा एकदा कर्ज नीट नीट का तपासून बघायचा आणि तो अर्ज संबंधित अधिकार्याकडे जमा करायचा.
- अशा रीतीने तुमची अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
KHAVATI ANUDAN YOJANA | खावटी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न पुढीलप्रमाणे –
खावटी अनुदान योजना कोणी सुरू केली ?
खावटी अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभाग यांनी सुरू केली.
खावटी अनुदान योजना नेमके काय आहे ?
ही योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांना आर्थिक पाठबळ देणारी योजना आहे.
खावटी अनुदान योजना कोणासाठी आहे ?
खावटी अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत करणारी योजना आहे.
खावटी अनुदान योजनेअंतर्गत किती रुपये पर्यंतची आर्थिक मदत लाभार्थीला मिळते ?
खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थीला रुपये चार हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत केली जाते.